व्हीएसआरएस न्युज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा आज पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली आहे.
महिलांना सक्षम करण्यासाठी काँग्रेसने जास्तीत जास्त महिलांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचेही प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर महिलांना तिकीट देताना त्यांची गुणवत्ता आणि समाजकार्य हाच निकष लावला जाईल. जात किंवा धर्म पाहून कोणालाही तिकीट दिले जाणार नसल्याचेही प्रियंका यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post