व्हीएसआरएस न्युज तिरुपती – शुक्रवारी तिरुपती देवस्थानाला भीषण पूर आल्यामुळे बालाजीच्या दर्शनाला गेलेले शेकडो यात्रेकरू अडकून पडले आहेत. पुरामुळे यात्रेकरूंना बाहेर जाता येत नसल्यामुळे देवाचे दर्शन बंद करण्यात आले.
तिरुमला येथील जपाली अंजनेय स्वामी मंदिर मुसळधार पावसामुळे पुर्ण पाण्याखाली बुडाल्याचे दृश्य बघायला मिळाले. तिरुमला टेकडीवरील मुख्य मंदिराला लागून असलेल्या चार माडा रस्त्यावर ही पाणी तुंबले आहे. त्याचबरोबर, पूर आणि भूस्खलनामुळे तिरुमला हिल्सकडे जाणारे घाटातील दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पवित्र टेकड्यांवर अडकलेल्या यात्रेकरूंसाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकाऱ्यांनी मोफत भोजन आणि निवासाची व्यवस्था केली आहे. बंगालच्या उपसागरातील दबावामुळे तिरुपती शहरात आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
भूस्खलनामुळे नारायणगिरी अतिथीगृह संकुलातील तीन खोल्यांचे नुकसान झाले, परंतु खोल्यांमधील लोक आधीच बाहेर आल्यामुळे, जिवीतहानी टळली. नारायणगिरीमधील इतर खोल्यांमध्ये राहणाऱ्या यात्रेकरूंना आणि जवळच्या एसव्ही गेस्ट हाऊसमधील यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक यात्रेकरूंनी आणि रहिवाशांनी तिरुपुतीमधील पुरस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत तिरुपतीला जाणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे.
रेनुगुंटा येथील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेले होते, त्यामुळे अधिकाऱ्यांना येणाऱ्या विमानांचे लँडिंग थांबवणे भाग पडले. हैदराबाद आणि बंगळुरू येथून तिरुपती येथे उतरण्यासाठी नियोजित केलेल्या दोन प्रवासी विमाने माघारी पाठवली गेली. मुसळधार पावसामुळे टाडा आणि सुल्लुरपेट दरम्यानच्या पुलाजवळ पाण्याची पातळी वाढल्यामुळे दक्षिण रेल्वेने गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.
चित्तूरचे जिल्हाधिकारी एम हरी नारायणन यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकार्यांना पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून आवश्यक पावले उचलण्यास जगनमोहन रेड्डी यांनी सांगितल्याचे
Discussion about this post