पवनानगर | (व्हीएसआरएस न्यूज) | तिकोणापेठ येथील भागवताश्रम मठात प. पु. सनातन स्वामी यांच्या प्रेरणेने स्वामी समर्थ आयुर्वेद उपचार केंद्र सुरू करण्यात आले. निगडी येथील स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक केंद्रांचे प्रसिद्ध आयुर्वेद निष्णात डॉ. अजित कदम हे या ठिकाणी अल्प दरात विविध व्याधींवर उपचार करणार आहेत. यांच्या उद्घाटन प्रसंगी मावळ तालुक्यात आयुर्वेदाची परिपाठी सुरू झाल्याचे मत रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य विनायकराव थोरात यानी व्यक्त केले.
सदर उपचार केद्राचे उद्घाटन प. पु. सनातन स्वामी, रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य विनायकराव थोरात, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत धर्माचार्य गोखले, उद्योजक वर्मा, दत्तात्रय निंबळे, मा. सरपंच, सोनाबुवा पडवळ, बाळासाहेब घोटकुले,संदिप भुतडा,,नितीनदादा घोटकुले, किसन घरदाळे, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील व गणमान्य मान्यवर उपस्थित होते.
या स्वामी समर्थ आयुर्वेद उपचार केंद्रात मुतखडा, मुळव्याध, मधुमेह, सांधेदुखी, मणक्याचे विकार, टाचदुखी आदी उपचार करण्यात येणार असल्याचे प. पु. सनातन स्वामी यांनी सांगितले. हे उपचार केंद्र सुरू करण्यासाठी भागवताश्रम मठ हितवर्धक मंडळ तिकोणा, कुडली रायगड, मुंबई, ठाणे व पुणे येथील स्वामी भक्तानी व्यक्त केले.
Discussion about this post