व्हीएसआरएस मराठी न्युज –
सर्वसामान्य गरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल या चार वस्तू 100 रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने ४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
याला २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीसुद्धा हा शिधा अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी गरिबापर्यंत पोहोचलेला नाही. कारण हा शिधा तसेच यातील काही जिन्नस राशन वितरण दुकानावरच पोहचलेला नसल्याकारणाने याचा बोजवारा उडाला आहे.
बऱ्याच ठिकाणी साखर व रवा उपलब्ध झाला असून चणाडाळ व पामतेल उपलब्ध झाले नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी साखर, रवा व पाम तेल पोहोचले असून चणाडाळ पोहचली न समोर आलं आहे. राजकारणी मात्र शिधा लवकरात लवकर पोहोचला जाईल. दीपावली संपायला आली आहे का ? संपली आहे का ? असं सांगण्यामध्ये मग्न आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही फार मोठी योजना असून हा शिधा जनतेपर्यंत पोहोचायला उशीर होईल, परंतु दिवाळी अद्याप संपलेली नाही असे सांगितले आहे.
Discussion about this post