व्हीएसआरएस मराठी न्युज –दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्यांनी यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यात भारतीय संघाने फायनल गाठून इतिहास रचला.
भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडला 20 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून स्मृती मानधना दमदार खेळी करत 32 चेंडूत 61 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने 44 धावांची झुंजार खेळी करत भारताला 20 षटकात 164 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर गोलंदाजीत दिप्ती शर्मा, स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
Discussion about this post