व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारचे सचिव या पदासाठीच्या निवडयादीत समावेश झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केलीय.
याबाबत माहिती देताना इक्बाल सिंह चहल म्हणाले आहेत की, ”मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारत सरकारने मला केंद्रात सचिव पदाचा दर्जा दिला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील या पदावर नियुक्ती ही सर्वाधिक अभिमानाची बाब.”
इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. चहल हे यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. तसेच जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. चहल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही त्यांनी काम केले असून, औरंगाबाद आणि ठाण्याचे जिल्हाधिकारीही होते.
Discussion about this post