व्हीएसआरएस मराठी न्युज –ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि बदललेल्या प्रभाग रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना, मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा प्रारूप तातडीने बनविण्याच्या सूचना औरंगाबादसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिल्या.
त्यामुळे नवीन वर्षात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सध्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आराखडा साधारण दोन ते तीन आठवड्यात तयार होऊन निवडणूक आयोगाकडे सादर होऊ शकतो. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून तो प्रसिद्ध करुन त्यावर सूचना हरकती मागविल्या जातील. या सूचना हरकती नोंदविण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली जाईल. त्यानंतर प्राप्त सूचना हरकतीवर जनसुनावणी होईल. ही प्रक्रिया झाल्यावर प्रभागांची आरक्षण सोडत आणि मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम राबविला जाईल. या सर्व गोष्टींसाठी आतापासून किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा बार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात उडू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Discussion about this post