व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. नुसतं तिरंगा फडकवला म्हणून देशभक्त झालो. राष्ट्रभक्त झालो. आपल्याला वाटतं भारतमाताही जणू काही आपलीच मालमत्ता आहे. तिची खरी व्यथा, अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो. ती व्यथा मांडण्याचं काम केलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले आहे.
मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणाचा ओढा कायम राहिला आहे. व्यंगचित्रकार काय असतो. तो काय करू शकतो याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मराठी माणूस आणि हिंदूचं काय झालं असतं हे लक्षात येतं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. मी का सांगतोय तर काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमूळं 62 वर्षांपासून आहेत. त्या आधीपासून माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली होती.
Discussion about this post