व्हीएसआरएस न्युज करोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
तसेच करोना महामारीत आई-वडील किंवा त्यांच्यातील एकाला गमावले आहे, त्यांच्या मुलांना नमोदय शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याचा विचार करावा.
या मुलांचा चांगल्या भविष्याचा विचार करणे राष्ट्र म्हणून प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. करोना साथीच्या भयावह परिस्थितीत बऱ्याच मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा घरातला कमावत्या व्यक्तीला गमावले आहे, अशा बातम्या येत आहेत.
यामुळे या मुलांना मोठा धक्का बसला आहे.
करोना महामारीमुळे अशा मुलांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाही. त्यांना आधार देणे गरजेचे आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात नवोदय विद्यालयांची उभारणी केली होती. सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात या नवोदय विद्यालयांचा उल्लेख केला आहे. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय सुरू आहेत.