व्हीएसआरएस मराठी न्युज –मुक्ताईनगर:-दि.३ कोरोनाच्या काळात शासनाने दिलेल्या नियम अटी मध्येच मर्यादित स्वरूपाचा मोजक्या लोकांमध्ये असा आषाढी वारी सोहळा पार पडला.त्यावेळी एस टी तून मोजक्या मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूर कडे नेण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने त्या अटी ,नियम व र्निबंध उठवले गेले आहेत.
आषाढी पायीवारी सोहळ्या करिता आज
मुक्ताईनगर मधून संत मुक्ताई च्या पालखीचे प्रस्थान पंढरपूर कडे झाले.३१३ वर्षाची ही अखंड परंपरा आहे.प्रस्थानापूर्वी संत मुक्ताई च्या मुर्तीला दुग्धअभिषेक करून विधिवत पूजा पार पडली.संत मुक्ताई ची पालखीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.प्रस्थान वेळी संत मुक्ताई विठ्ठल नामाचा गजर
करण्यात आला.
या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या
दिंडीतील वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे व भक्तिमय वातावरणात खांद्यावर भगवी पतागा घेऊन, टाळ मृदुंगाच्या आवाजात,विठ्ठलाच्या व संतांच्या जयघोषात आनंददायी प्रवास सुरू झाला आहे.
Discussion about this post