व्हीएसआरएस मराठी न्युज -इंद्रायणी नदी पात्रामध्ये दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे होणारे मिश्रण आणि वाढत्या जलपर्णीमुळे इंद्रायणी गटारगंगा बनत आहे. मंगळवारपासून दूषित पाण्यामुळे तीर्थक्षेत्र देहूगाव येथे इंद्रायणी नदीतील माशांचा मृत्यू होऊ लागला आहे.
इंद्रायणी नदी घाटावर कपडे धुण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रामध्ये मृत व्यक्तीचे कपडे किंवा अनावश्यक असलेले गोधड्या टाकून देणे, दशक्रिया विधी नंतर निर्माल्य तसेच मडकी, पूजेनंतर उर्वरित साहित्य नदीपात्रात टाकून देणे, केमिकल युक्त दूषित व मैलामिश्रित सांडपाण्याचे नदीत होणारे मिश्रण, धुतलेल्या कपड्यांमुळे फेसाळणारे साबणाचे केमिकलने पाणी, वाढते जलपर्णी तसेच वाळू उपसा यामुळे दूषित होणारे पाणी अशा अनेक कारणांमुळे पवित्र इंद्रायणी गटार गंगा होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांचे ही आरोग्य धोक्यात येत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Discussion about this post