व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-इंद्रायणी नदी पात्रात गरुड स्तंभा जवळ जलपर्णी चा विळखा हळूहळू वाढत होता.
आषाढी वारी मोजक्याच काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
विशेषतः गरुड स्तंभ ते भक्त पुंडलिक मंदिरा पर्यंत नदी घाटा च्या दोन्ही बाजूंनी भाविक भक्त वारकरी यांची मोठ्या संख्येने स्नानासाठी गर्दी असते.
त्यामुळे जलपर्णीचा विळखा या भागाच्या नदीपात्रात वाढू नये व भाविक वारकरी यांची स्नानासाठी गैरसोय होऊ नये या करिता प्रशासनातर्फे जलपर्णी काढण्याचे
काम तिथे चालू होते.इंद्रायणी नदी चे पाणी दूषित असल्याने आषाढी वारी काळात भाविक वारकऱ्यांना नदीचे पाणी पिण्यास ,स्वयंपाक करण्यास तसेच तीर्थ म्हणून प्राशन करण्यास सक्त मनाई केली आहे.या बाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचना आलेल्या आहेत. तसेच नदीपात्र दूषित होऊ नये म्हणून धुणी भांडी नदीपात्रात करू नये .भाविक व वारकरी यांनी नळाचे व नगरपालिका प्रशासन विविध ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठा करणार आहे .त्याचा उपयोग पिण्यासाठी स्वयंपाक करिता करण्यात यावा.या सूचना आल्या आहेत.
सद्यस्थितीत गरुड स्तंभ ते भक्त पुंडलिक मंदिरा पर्यंत पूर्ण पाणी दूषितपाण्याने काळवंडलेले दिसून येत आहे.
सिद्धबेट बंधाऱ्याच्या वरच्या नदीपात्रात ,नृसिंव्ह सरस्वती मठ याच्या शेजारी असणाऱ्या बांधाऱ्याच्या नदीपात्रात जलपर्णी चा पूर्ण विळखा पडलेला दिसून येत आहे.
तर भक्त पुंडलिक मंदिराच्या पुढच्या नदीपात्रात अशीच परिस्थिती दिसून येत आहे.सद्यस्थितीत सिद्धबेटाच्या बंधाऱ्या खालील नदीपात्रात असलेले पाणी रासायनिक दूषित पाण्याने फेसाळलेले दिसून येत आहे.पवित्र इंद्रायणी नदीचे रासायनिक दूषित फेसाळले पाणी तसेच दूषित काळवंडलेले पाणी पाहून भाविक व आळंदी नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Discussion about this post