व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.१६ गेली काही दिवस सतत पाऊस चालू आहे. चाकण चौक,पद्मावती रस्ता,भागीरथी नाला,वडगांव रोड इ.ठिकाणी रस्त्यावर, फुटपाथवर उघड्यावरच काही नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे.
चाकण चौक येथे चाकण रस्त्या लगत च एका ठिकाणी चार पाच दिवस कचरा न उचल्याने त्यापासून दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे त्या परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशी तेथील नागरिकाने पालिका कर्मचाऱ्यां विषयी नाराजी व्यक्त केली आहे.पावसाच्या वातावरणात रस्त्याच्या कडेला शिळे अन्न पदार्थ,खराब भाजीपाला काही नागरिकांनी टाकल्याने ते काही दिवस न उचल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी पसरते.कचऱ्याच्या ठिकाणी व इतर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डास निर्मिती होते.त्या डासां पासून मलेरिया, डेंगू इ.आजार होण्याची शक्यता असते.सद्यस्थितीत आळंदी शहरात ही डेंगूचे रुग्ण सापडत आहेत.
त्यामुळे आळंदी शहरात डास प्रतिबंधक फवारणी व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.
Discussion about this post