व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: आळंदीतील माऊली बागे जवळील असलेल्या नवीन इंद्रायणी पुलाला व चाकण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे. त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
तो कचरा तसाच पडून असतो. जास्त कचरा साचलेला दिसल्यास तो पेटवून दिल्याचे
ही अधूनमधून तिथे दिसते.या परिसरात कोठेही कचरा टाकू नये.टाकल्यास ५००रु.दंड असा फलक ग्रामदैवत भैरवनाथ ट्रस्ट ने लावलेला असून सुद्धा त्या फलका खाली व त्या फलकाच्या च आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेला दिसून येत आहे. तसेच इंद्रायणी हॉस्पिटल समोर रस्त्याच्या कडेला व जवळ असणाऱ्या ओढ्यात ही कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतो.मरकळ रस्ता,राजगुरूनगर बँके शेजारी,पद्मावती रस्ता,वडगांव रस्त्यावर सिद्धीविनायक मंगल कार्यालयाच्या पुढील फूटपाथवर,भागीरथी नाला व इ. विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग दररोज दिसत आहेत.स्वच्छ अभियाना द्वारे जनजागृती करून व ठिक ठिकाणी विविध संस्था स्वच्छतेसाठी श्रमदान कार्य करून आल्याचे दिसून येत असून सुद्धा चाकण चौक ते इंद्रायणी नदी पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला ,इंद्रायणी हॉस्पिटल समोर, मरकळ रस्ता, वडगांव रस्ता व ईतर विविध रस्त्यांच्या कडेच्या ठिकाणी कचऱ्यांचे ढीग वारंवार रोज पाहायला भेटत आहे.स्वच्छता अभियान फक्त त्या संस्थे पुरतेच मर्यादित राहिलेले दिसून येत आहे. रोज रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांनी आळंदी शहरातील स्वच्छता अभियानाला कचऱ्याची टोपलीच दाखवल्याचे चित्र दिसून येत आहे.कधी कधी पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या नादुरुस्त पाहायला भेटतात.त्यामुळे त्या विविध भागात पोहचत नाहीत.चाकण घाटात, च-होली रस्ता, वडगांव रस्ता या रस्त्यांच्या कडेला ही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातील नागरिकांनी
मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला दिसून येत आहे.
Discussion about this post