व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –माता सुरक्षित, घर सुरक्षित अभियाना’अंतर्गत अ प्रभाग क्षेत्रातील ७९ महिलांच्या आरोग्याची तपासणी, पालिका हास्पिटल तर्फे करण्यात आली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’ची सुरुवात करण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. यात राज्यातील तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून, महापालिकांचा सहभाग मोलाचा मानला जातो. महापालिका परिक्षेत्रातील एक कोटी ५३ लाख ६६ हजार ६३४ महिलांची नोंद असून, यातील ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात अन्यत्र आरोग्य विभागाने एक कोटी ५१ लाख ६४ हजार ९५९ महिलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. म्हणजेच ४३ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही या आरोग्य तपासणी मोहीमेमागची संकल्पना असून, महापालिकांतील आकुर्डी हास्पिटल कडून तपासणीचा तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे.
डॉ होडगर सर डॉ साळुंखे सर, लता जगताप पीएचएन, निकिता आडे एएनएम, शितल कांबळे एएनएम गणेश गायकवाड लॅब टेक्निशियन आदी यांनी शिबीर मध्ये सहयोग केला.
Discussion about this post