व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –कधी काळी जास्त वजन असेल तरच हृदयरोगाचा धोका होता; परंतु आता तसे राहिले माही. अगदी १५ वर्षांच्या मुलांपासून ते ३० वर्षांच्या तरुणांनाही हार्ट अटॅक येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे छातीत दुखणे किंवा इतर लक्षणे जाणवली तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थोडेही दुर्लक्ष जिवावर बेतू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चरबी वाढल्याने रक्ताच्या गाठी तयार होतात. या काढण्याचे इंजेक्शन देऊन गाठी जिरवणे किंवा अँजिओप्लास्टी असे दोन मार्ग असतात; परंतु मागील काही दिवसांपासून तरुणांमध्ये सिगारेट, तंबाखू खाण्यासह मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे, तसेच अनेक जण व्यायाम करीत नाहीत. अशा लोकांना हृदयरोगाचा धोका अधिक जाणवत आहे. यातूनच हार्ट अटॅक येऊन मृत्यू होत आहे. एकूण अटॅक आलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
अटॅक येण्याची कारणे?
उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय कोलस्टेरॉल लेव्हल, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ खाल्याने, अति मद्यपान, व्यायामाचा अभाव, नशा, अयोग्य जीवनशैली हार्ट अटॅक येण्याची मुख्य कारणे आहेत.
ह्रदयविकार येण्यामागे ताणतणाव हे हे सुद्धा कारण आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आता युवकांमध्येही अटॅक येण्याचे प्रमाण नये, वाढत आहे डॉ अनिरुद्ध टोणगांवकर एम डी फिजिशियन ,हृदयरोग तज्ज्ञ
याकडे दुर्लक्ष करू नका
१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ छातीत दुखत असेल तर घरी बसू नये. तत्काळ रुग्णालय जवळ करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ईसीजी करावे. यातील टिपिकल बदल पाहून डॉक्टर उपचार करतात. दिलेली औषधी वेळेवर आणि नियमित घेतल्यास धोका टळू शकतो.
वेळीच लक्षणे ओळखा
छातीत दुखणे, घाम येणे, दम लागल्यासारखे होणे, छातीत धडधड होणे, डावा खांदा दुखणे, मान दुखणे, जबडा दुखणे अशी लक्षणे असतील, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काय काळजी घ्याल?
नियमित व्यायाम करावा, दररोज किमान २० मिनिटे चालावे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवावा, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ बंद करावेत, नियमित मद्यपान करू नये, सकस आणि योग्य आहार घ्यावा. कोणतीही औषधी डॉक्टरांच्या. सल्ल्यानेच घ्यावी. स्वत:हून औषधी घेणे बंद करा.
१० टक्के रुग्ण हृदयरोगाचे
खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या एकूण रुणांपैकी जवळपास १० टक्के रुण हे हृदयरोगाचे असल्याचे सांगण्यात आले. यात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले.
Discussion about this post