व्हीएसआरएस मराठी न्युजआळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांच्यावतीने लाईफ स्टाईल सेमिनार पी सी एम सी पोलिस अँड देअर फॅमिलीस म्हणजेच
पोलीस व त्यांचे कुटूंब यांच्या जीवनशैलीवर परिसंवाद श्री कृष्ण प्रकाश पो. कमिशनर यांच्या मार्गदर्शनाखाली व सत्वलाईफ स्टाईल म्यानेजमेंट यांच्या सह सहयोगातून शुक्रवारी दि.२२ रोजी आळंदी येथे राजेश मल्टीपर्पज हॉल या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. आळंदी पोलीस व त्यांचे कुटूंबीय, दक्षता समिती ,दक्षता सेवा फाउंडेशन, पोलिस मित्र यावेळी उपस्थित होते.
डॉ. सोनल पुरोहित यांनी चांगल्या आरोग्यासाठी मानवी जीवनशैली कशी असावी कशी नसावी याबाबत सविस्तर येथे माहिती दिली. फॅट्स,आहार,पाणी,व्यायाम,
मानसिक स्थिती या सर्व विषयांवर सखोल माहिती दिली. त्यांनी प्रथम सांगितले फॅट्स(चरबीचे) प्रकार व जास्त चरबीयुक्त पदार्थ कोणते
त्यांची नावे,जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्याने शरीरात होणारे आजार,बाहेरील व घरातील जास्त तेलकट पदार्थांचा खाण्यात आल्यावर त्यापासून शरीरात होणारे दुष्परिणाम, तसेच बाहेरील खाद्यपदार्थ उदा. पैकेटांमधील चिप्स,कुरकुरे ,बाहेरील तेलकट पदार्थांपैकी बटाटेवडे, समोसे ई.पदार्थ जास्त तेलकट ,जास्त मसाले युक्त पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार.आहारात पांढऱ्या मिठाचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा. शक्यतो त्या मिठा ऐवजी सैंधल मीठ वापरावे हा यावेळी सल्ला देण्यात आला.मैद्याचे पदार्थ खाल्याने पचनशक्तीस होणारे त्रास,आहारात कच्या भाज्या म्हणजेच
काकडी,टॉमेटो,गाजर,बिट ई. भाजीपाला यांचा समावेश केल्याने शरीरास होणारे फायदे ,उन्हाळ्यात बाहेरील कोल्ड्रिंक्स पिण्या ऐवजी ताक,नारळपाणी,
फळांचारस,लिंबू पाणी ,ऊसाचा रस हे पिल्याने शरीरास होणारे फायदे,मानवी शरीरा करीता जिऱ्याचे पाणी,
खडीसाखर,गुळ ,सैंधव मीठ इ.पदार्थ यांच्यात असणारे औषधी गुणधर्म ,त्यात असणारे जीवनसत्त्वे व हे सर्व आहारात योग्य प्रमाणात,योग्य वेळेत, योग्य प्रकारे वापर केल्यास शरीराला होणारे फायदे ही सांगण्यात आले.ड्राय फ्रुटस दररोज योग्य त्या प्रमाणात खाल्याने शरीरास होणारे फायदे सांगण्यात आले.योग्य आहार घेतल्यास व योग्य प्रमाणात व्यायाम केल्यास तुम्हाला असणारे आजार ही कमी
होऊन काही महिन्या नंतर तुम्ही औषधें मुक्त जीवन जगू शकता याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.डायबेटीस ,थायरॉईड, कॅन्सर,इ. रोग मुक्त जीवन जगण्यासाठी व ते आजार होऊ नये यासंदर्भात ही माहिती त्यांनी दिली.पाय ,गुडघे ,गुडघ्यांच्या वाट्या यांच्या आजारा बाबत माहिती ते आजार कमी करण्यासाठी कोणता आहार आवश्यक आहे याबद्दल येथे माहिती दिली.
डॉ. सोनल पुरोहित यांनी व्यायाम व योगाचे मानवी शरीराला होणारे फायदे ही सांगितले.दिवसातून रोज कमीत कमी चाळीस मिनिटे तरी व्यायाम करावा हा सल्ला त्यांनी येथे दिला.
पुशअप्स,सीटअप्स, शीर्षासन,प्राणायाम, ई.व्यायामांची माहीत देत असताना काही पोलीस अधिकारी ,कर्मचारी वर्ग व पोलीस मित्र यांनी व्यायाम व योगाचे प्रात्याक्षिके ही यावेळेस करून दाखवली.पोलिसांनी केलेली प्रात्यक्षिके पाहून आळंदी पोलीस दल हे सर्वात तंदुरुस्त पोलिस दल असल्याचे गौरव उदगार त्यांनी काढले.
ह्या कार्यक्रमाच्या शेवटी त्या म्हणाल्या श्रीकृष्णाने म्हणले आहे, ही वेळ ही निघून जाईल. म्हणजेच जीवनात चांगली वा वाईट वेळ दीर्घकाळ राहत नाही.मन कायम आनंदीत ठेवा.आपल्या जीवनात आपण आनंदी हसत मुख राहिले पाहिजे.मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी ,मन प्रसन्न ठेवलेच पाहिजे.सर्व आळंदी पोलिसदला तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आळंदीतील वारकरी संप्रदायाची,भक्तीभावाची संस्कृती जपत शेवटी एका पोलीसाने भजन ही गायले.
Discussion about this post