व्हीएसआरएस न्युज पितृपक्षात अनेकजण पित्तरांच्या स्मरणार्थ दानधर्म करतात. पण बऱ्याचवेळा नेमक्या कुठल्या गोष्टी दान कराव्यात हेच काहीजणांना माहित नसते. त्यामुळे पितृपक्षात काय दान करतात हे जाणून घेऊया…
गोदान –
गोदान केल्याने संबंधित मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो असे मानले जाते. पण जर गोदान करणे लगेच जमणार नसेल तर तसा संकल्प केला तरी चालू शकते.
भूदान –
भूदान म्हणजे जमीन दान करणे. पण त्यासाठी जमीन विकत घेणे गरजेचे नाही. तर मातीही तुम्ही दान करू शकता.
तीळ दान –
यात काळे तीळ दान केले जातात. काळे तीळ भगवान विष्णूला प्रिय असतात.
स्वर्ण दान –
स्वर्ण दान केल्याने व्यक्तीची कर्जातून मुक्ती होते असे मानले जाते. जर सोने दान करणे शक्य नसेल तर धनदान करावे.
अन्नदान –
यात तुम्ही कुठलाही खाद्यपदार्थ, कडधान्य, धान्य दान करू शकता. अन्नदान केल्याने पित्तरांच्या आत्म्याला शांती मिळते. ते आशिर्वाद देतात, असे मानले जाते.
वस्त्रदान –
शास्त्रात असे म्हटले जाते की पित्तरांनाही बदलणाऱ्या ऋतुमानाची जाणीव होते. यामुळे ते आपल्या वंशजांकडून वस्त्राची अपेक्षा करतात. त्यामुळे गरजू व्यक्तीला वस्त्रदान केले जाते.
चांदी दान –
पुराणामध्ये पित्तरांचा वास हा चंद्रावर असल्याचे लिहिले आहे. यामुळे त्यांना चांदीच्या वस्तू अधिक प्रिय असल्याचे समजले जाते.
गुळाचे दान –
गुळाच्या दानाने पित्तर लवकर प्रसन्न होतात असा समज आहे. यामुळे पितृपक्षात गुळाचे दान केले जाते.
मीठ दान –
मीठाचे दान करण्याआधी आपल्या पित्तरांचे स्मरण करावे. त्यानंतर ब्राम्हण किंवा इतर गरजू व्यक्तीला भोजन द्यावे.
हिंदू धर्मात या 15 दिवसांना विशेष महत्त्व असून या काळात गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात दानधर्मही केले जाते.
Discussion about this post