व्हीएसआरएस न्युज पिंपरी- स्थानिक नागरिकांना त्याचबरोबर इतर वाहन चालकांना वाहतुकीसाठी खुप मोठा वळसा घालुन येजा करण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत होता.
आता २०२१ सालीही येथील उड्डाणपुलाचे काम पुर्ण झालेले असताना देखील हा उड्डाणपुल खुला करण्यात आलेला नाही, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले आणि भाजप नेते सचिन काळभोर यांनी नुकतेच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याचे निवेदन देऊन हा उड्डाणपुल लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
“जगदगुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती) उड्डाणपुल” असे याचे नामकरणही उड्डाणपुलाला करण्यात आले आहे, सध्यस्थितीत येथील काम पुर्ण झाले आहे परंतु नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासामुळे नागरिक आता विरुद्ध दिशेने ये-जा करत आहेत त्यातून छोटेमोठे अपघात घडत आहेत, मागे अशाच एका प्रकारामुळे दुजाकी चालक गंभीर जखमी झाला होता, इतक्या वर्दळीचा आणि मुख्य वाहतुकीला जोडणारा हा रोटरी उड्डाणपुल व ग्रेडसेप्रेटर बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उड्डाणपुल लवकर सुरू करा अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्त यांना पत्र द्वारा केली आहे.