व्हीएसआरएस न्युज चिंचवड-पिंपरी-चिंचवडसह मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.
त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे. धरण सुमारे 60 टक्के भरले असून धरणातून अजून कोणत्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही. केवळ पावसाचे पाणी आहे.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारपासून पाऊस पडत आहे. मावळात धुवांधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे ओसांडून वाहू लागले आहेत. मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदीरातही पाणी शिरले आहे. मंदिराचा अर्धा भाग पाण्या खाली बुडाला आहे.
पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनवर तांबोळी म्हणाले, ‘पवना धरण परिसरात पावसाचा जोर आहे.
त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 1 जून पासून धरण परिसरात 1219 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 55 टक्के पाणीसाठा होता.
दिवसभरात त्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली. सायंकाळी 60.74 टक्के पाणीसाठा झाला. सकाळपासून 89 मिली मीटर पाऊस झाला आहे.
धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरु केला नाही. धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
Discussion about this post