व्हीएसआरएस मराठी न्युज –शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणात 28.60 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला 28.77 टक्के पाणीसाठा होता.
आंद्रा धरणातून 50 एमएलडी पाणी पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. मात्र, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी शहराच्या विविध भागातून येत आहेत. पावसाळ्याचे आगमन लांबल्यास किंवा पुरेसा पाऊस न झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते.
Discussion about this post