व्हीएसआरएस मराठी न्युज –
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम असतात पण मंत्री देखील हजर नव्हते. फ्रेश होऊन येतो म्हणून मंत्री जायचे आणि यायचेच नाही. यांना सत्ता पाहिजे पण काम करायचे नाही. सत्ताधारी पक्षाची पुढची रांग पूर्णपणे रिकामी असायची. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, कोडगेपणाचा कळस या अधिवेशनात पाहायला मिळाला. लक्षवेधीचा तर उच्चांक झाला. मंत्रिमंडळाचा देखील विस्तार झाला नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. सत्तारूढ पक्षाने विधिमंडळाच्या आवारात राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. हे विधिमंडळाच्या पावित्र्याचे भंग करणारं होतं. त्यांचा आम्ही निषेध करतो. मागणी करून देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही.
Discussion about this post