व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन थोर समाज सेवक आणि पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी आज शनिवार (२५जून) काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार विजय भोसले यांनाचा पत्रकार महर्षी प्र. के अत्रे पुरस्कार 2022 देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुप चे मुख्य संपादक डॉ.लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गिरीश प्रभुणे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युवा मध्ये पत्रकारितेची बिकट वाट आहे. स्वतःचा तोल स्वतः हा सावरावा लागतो कोणीही मदतीला येत नाही मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमान पत्र प्रकाशित करत होतो. मी सडे तोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्ले खोरांनी हल्ले केले आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता आपल्या भाषण म्हणाले की,राजकारण, समाजकारण अथवा प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी नागरिक पत्रकारानकडे धाव घेतात हा जो पत्रकारांप्रति विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे. नव्याने स्थापन झालेल्या संघटना व पदाधिकाऱ्यांना व्ही. एस आर एस न्युज मीडिया ग्रुप नेहमीच बरोबर असेल.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या संघाने माझा जो पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पत्रकार महर्षी प्र.के अत्रे पुरस्कार देऊन जो गौरव केला त्या बदल संघाचे मी आभार व्यक्त करतो. पिंपरी-चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत कोरोनाच्या भीषण काळात घरोघरी जाऊन अन्न दान केले हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक कॉग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आर पी आय चे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे, बी.आर.माडगूळकर उपस्थितीत होते. यावेळी अध्यक्ष – दादाराव आढाव,वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव,उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस – सुनील कांबळे,चिटणीस – श्रध्दा कोतावडेकर /कामथे, खजिनदार – जितेंद्र गवळी कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी, संतोष जराड,विश्वास शिंदे,सदानंद रानडे या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.
Discussion about this post