व्हीएसआरएस मराठी न्युज-आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- दि.१७ मावळ भागात मुसळधार पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने आळंदीतील इंद्रायणी नदीपत्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.गेली पाच सहा दिवस सातत्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने इंद्रायणी घाट नागरिकांसाठी बंद होता. आज मात्र नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने नदी घाट नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता.
आळंदीतील नागरिकांनी तसेच बाहेरील पर्यटकांनी नदी घाटावर गर्दी केली होती.नदी घाटावर गरम मका कणीस,भाजलेल्या गरम शेंगा, भाजलेले गरम फुटाणे ,शेंगदाणे व विविध खाद्यपदार्थांचा नागरिक आस्वाद घेत होते.नदी घाटावरती आलेले पर्यटक विशेषतः तरुण तरुणी फोटो सेशन तर सेल्फी घेण्यात दंग होते.इंद्रायणी नदी घाट विविध हातगाड्यांच्या खाद्यपदार्थाने व नागरिकांच्या गर्दीने सजला होता.
नागरिकांसाठी नदी घाट खुला केल्याने नागरिक मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते.
आज तिसऱ्या दिवशी इंद्रायणी नगर येथून जलपर्णी चे काढण्याचे काम पोकलैंडद्वारे सुरूच होते.तसेच भक्ती सोपान पुलावरील पाणी कमी झाल्याने भक्ती सोपान पुलालगत अडकलेली जलपर्णी काढण्याचे काम कर्मचाऱ्यां मार्फत चालू होते.
Discussion about this post