व्हीएसआरएस मराठी न्युज -आकुर्डी त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाची बेकायदेशीररित्या बदनामी केल्याने सेवेकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्याने खोटे आरोप करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी निगडी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून श्री स्वामी समर्थ गुरुपीठावर गैरव्यवहाराचे आरोप केले जात आहे. लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे कार्य नेहमीच समाजहित जोपासणारे असल्याने गुरुपीठामार्फत समाजपयोगी कामे केली जातात. परंतु काही विघ्नसंतुष्ट लोकांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटींचा अपहार, आदिवासींच्या जमीनी व बांधकामाबाबत जे बेकायदेशीर वक्तव्ये केलेली आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. या सदरील वक्तव्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्त परिवारात प्रचंड रोष निर्माण झालेला असून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यामुळे सर्व सेवेकाऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले प.पु. गुरुमाऊली व मार्ग यांची बदनामी करून चुकीचा संदेश समाजात पसरवण्याचे कृत्य जात आहे.
त्याला लगाम घालणे केले गरजेचे असल्याने प्राप्त परिस्थितीमध्ये सदरील लोकांनी जी वक्तव्ये केलेली आहेत ती वक्तव्ये निरर्थक व चुकीची तसेच बिनबुडाची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सर्व सेवेकर्यांचे श्रद्धास्थान असलेले परमपुज्य गुरू माऊली व मार्ग याची बदनामी करून चुकीचा संदेश जनमाणसांत पसरवून सेवेकऱ्यांमध्ये , दिलीश आंब्रे, सागर चव्हाण, संदिप धनवडे, संदिप नरवडे, संतोष आंद्रे, संतोष क्षीरसागर, सुरेखा पाटील व २५ ते ३० युवा सेवेकरी ,महिला सेवेकरी उपस्थित होते.
Discussion about this post