व्हीएसआरएस मराठी न्युज -शाळांमधून मध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी केली.
लोकसभेत शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करताना गांधी म्हणाल्या, कोरोनाचा सर्वांत मोठा फटका मुलांना बसला आहे. मुलांना आज पोषण आहाराची गरज आहे, त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
देशात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम शाळा बंद करण्यात आल्या तसेच कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर सर्वांत शेवटी शाळा उघडण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमांतर्गत लोकांना अन्नधान्याचे वाटत सुरू करण्यात आले, याकडेSonia Gandhi त्यांनी लक्ष वेधले.
अनेक मुलांच्या पालकांना कोरोनामुळे रोजगार गमवावा लागल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लोकांना रेशनमधून धान्य वितरित करण्यात येत असले तरी, तो शिजलेल्या अन्नाचा पर्याय ठरू शकत नाही. मुल आता शाळेत यायला लागल्यामुळे त्यांना पोषण आहाराची जास्त गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मध्यान्ह भोजन योजना सुरू केल्यामुळे मध्येच शाळा सोडलेली मुले परत शाळेकडे वळू शकतात, असे गांधी म्हणाल्या.
Discussion about this post