व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- दि.१ आषाढी वारी काही दिवसांवर आल्याने विश्व श्रीराम सेना व आळंदी ग्रामस्थ नागरिक यांच्या वतीने आळंदी शहरातील दुरावस्थेत व दुर्लक्षित असलेले स्वच्छता गृह व आषाढी वारीच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमाने आवश्यक असणारी कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी या नावे निवेदन आळंदी नगरपरिषद कार्यालयात दि.१जून रोजी देण्यात आले.
१)आळंदी मधील च-होली रस्त्यावरील ४ नंबर शाळे शेजारील असणारे स्वच्छता गृह साफ सफाई करून व तेथील आवश्यक त्या वस्तूंची दुरुस्ती करून वारी काळात भाविकांसाठी तसेच कायम स्वरूपी नागरिकांसाठी उपलब्ध व्हावे.
२)वडगांव रस्त्यावरील स्वच्छता गृह दुरवस्थेत असून सद्यस्थितीत बेसिन मध्ये नळ व काही शौचालयात ही नळ नाही,छताच्या सिलिंग स्टाईल्स दुरवस्थेत आहेत त्या ठिकाणी नगरपालिके तर्फे पाहणी करून तेथील दुरवस्थेत असलेले स्वच्छता गृह योग्य अशी दुरुस्ती व स्वछतागृहातील आवश्यक अश्या वस्तू बसवून ते भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावे.
३)आषाढी वारी काळात नदीघाटा वर महिलांसाठी चेजिंग रूम उपलब्ध करून द्यावी.
४)नदी बंधाऱ्यावरील पाईप लाईन गळती तसेच हजेरी मारुती मंदिरा
जवळील पाणी गळती लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी.
५)लक्ष्मीमाता चौकातील पाईपलाईन
वॉल दुरुस्ती व पाणी नियोजनासाठी फुटपाथ खोदून केलेला मोठा खड्डा लवकरात लवकर तेथील काम पूर्ण करून फुटपाथ पूर्वरत करावा.
६)आषाढी वारी काळातील फिरत्या शौचालया पाशी पुरेसा विद्युत प्रकाश नसतो हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवत असून त्याबाबत योग्य उपाय योजना करणे.
उदा. आळंदी जुन्या पुलाजवळ नदीकाठी ठेवण्यात येणारे फिरते शौचालय.
७)नगरपरिषदे जवळ असणाऱ्या नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटर मध्ये
जिन्याजवळ करण्यात आलेल्या स्वच्छता गृहांमध्ये पाण्याची व्यवस्था करून ते लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करावे.
या निवेदनात या कामांचा उल्लेख असून विश्व श्रीराम सेना समाजिक संगणक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली सदस्या च्यावतीने तसेच आळंदी ग्रामस्थ नागरिक महेश रामदास कुऱ्हाडे, रोहित संजय कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर जालिंदर कुऱ्हाडे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
Discussion about this post