व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-आळंदीत सर्व भागात ठीक ठिकाणी विविध ठिकाणच्या दिंड्या व दिंडीतील भाविक हरिनामाच्या नामाच्या गजरात दाखल झाले.
सकाळी प्रदिक्षणा रस्त्यावर अनेक दिंड्या विविध वाद्य वाजवत माऊली तुकाराम जयघोष करत प्रदक्षणा पूर्ण करत होत्या. त्यामुळे आळंदी पूर्ण पणे भक्तिरसात न्हाहून निघाली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष वारी सोहळा मर्यादित स्वरुपात मोजक्या लोकांमध्येच पार पडला होता.यंदा मात्र आषाढी पायी वारी सोहळ्याला कुठलेही निर्बंध नसल्याने मोठ्या संख्येने वारकरी भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.
आज दुपारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त प्रथा परंपरेने मानाच्या दिंड्या आत घेण्यास सुरुवात केली.दिंड्यातील भाविक वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामा च्या जयघोषात विठ्ठल नामाच्या गजरात खांद्यावर पताका घेऊन ,महिलांच्या डोईवर तुळसी वृंदावन,विठ्ठल मूर्ती,भाविक वारकरी वीणा, मृदुंग ,टाळ
वाजवत मंदिरात येत होते.त्या सुमधूर आवाजाने मंदिरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले
होते.मंदिरात वारकरी भाविकांनी फुगडी,हरी भक्तीत तल्लीन होऊन नृत्या चा आनंद लुटला.दहीहंडी सारखा मनोरा करत त्यावर सरते शेवटी चढून वर मृदुंग वाजवणाऱ्याने भाविकांचे लक्ष वेधले होते.माऊली माऊली नाम घोषात मंदिरातील परिसर दुमदुमून गेला होता.मंदिरात माऊलींच्या अश्वांचे आगमन झाले.श्री गुरू हैबतराव बाबा यांच्या तर्फे श्रीं ची आरती झाली.तद्नंतर संस्थान तर्फे श्रीं ची आरती झाली.प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला.वीणा मंडपात ठेवलेल्या पालखी मध्ये श्रीं च्या म्हणजेच माऊलींच्या पादुका प्राणप्रतिष्ठापीत करण्यात आल्या.
माऊलींची पालखी सुंदर आकर्षक रीत्या फुलांनी सजवण्यात आली होती.
संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोटी चे वाटप करण्यात आले.श्री गुरू हैबतराव बाबा तर्फे दिंडी प्रमुख ,प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.मंदिरातून माऊलींचे अश्व बाहेर गेले.
आणि त्यानंतर रात्री ८:३०वा. माऊली माऊली च्या जय घोषात वीणा मंडपातून माऊलींची पालखी बाहेर पडून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले..मंदिराला प्रदक्षिणा करून महाद्वारातून पालखी बाहेर पडली. बाहेरील प्रदक्षिणा रस्त्यावरील बहुसंख्य वारकरी भाविक माऊलींच्या पालखी दर्शनाकरिता पालखीची आतुरतेने वाट पाहत होते.भाविकांना पालखीचे दर्शन झाल्यावर चेहऱ्यावर आनंद व मनातून समाधान लाभल्याचे दिसत होते.प्रदक्षिणामार्गाने भराव रस्ता -भैरवनाथ महाराज चौक-हजेरी मारुती -चावडी चौक-महाद्वार चौकातून गांधीवाडा येथे आज मुक्कामास गेली.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आमदार रोहितदादा पवार,आमदार श्रीकांत भारतीय,
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान चे पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पा. विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभयजी टिळक , शितोळे सरकार,मालक आरफाळकर व देवस्थानचे माननीय प्रमुख मानकरी वर्ग उपस्थित होते.
Discussion about this post