व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त राज्यातील विविध ठिक ठिकाणा वरून भाविक आळंदीत दाखल होत असताना दिसत आहेत. आषाढी पायी वारी साठी आलेले भाविक पवित्र इंद्रायणी पात्रात स्नान करताना दिसत होते.
तर घाटावरती दशक्रिया विधी साठी येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था असणाऱ्या सभागृहाच्या सावलीचा व तेथील झाडांचा सावलीचा आधार घेत तिथे अल्पसा विसावा घेत बसलेले भाविक दिसत होते. नदी लगत च्या इंद्रायणी नगर येथील पदपथ,सिद्धबेट येथील वृक्षांच्या सावलीत भाविक ,विश्रांती, वामकुक्षी घेताना दिसून येत होते.तर इंद्रायणी घाटावरती विरंगुळा म्हणून गप्पा गोष्टी करत असल्याचे चित्र पाहायला भेटत होते.भाविक भक्त, वारकऱ्यांनी ही आळंदी दोन तीन दिवसात मोठ्या संख्येने बहरणारआहे.
वारकऱ्यांसाठी असणाऱ्या साहित्यांची (टाळ, मृदुंग, वीणा इ.)विविध संतांची धार्मिक पुस्तकांनी व हार,फुले प्रसादांनी शहरातील दुकाने सजू लागली आहेत.वारी साठी आलेले छोटे मोठे व्यावसायिक विविध ठिकाणी दिसत होते.
भाविक भक्त हे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शना सोबत माऊलींच्या जीवनकार्याशी संबधीत असलेल्या सिद्धबेट, संत ज्ञानेश्वर यांनी चालवलेली भिंत,विश्रांतवड अश्या गावातील ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तेथील दर्शन घेत आहेत.
ठीक ठिकाणी भाविक भक्त धर्मशाळेत टाळ मृदुंगा सहित हरी नामाचा गजर करत आहेत. तर कुठे काही वृद्ध वारकरी एकत्र बसून हरिपाठाच्या हरी भजनात दंग झाले आहेत.
20 आणि 21 जून रोजी पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. देहूवरून संत तुकाराम महाराजाची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल, तर 21 जूनरोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारी 9 जुलैला पंढरपुरात पोहोचणार असून, आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त आता आळंदी, देहूत वारकऱ्यांची मांदियाळी होण्यास सुरुवात झाली आहे. देहू, आळंदी याठिकाणी संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. माऊलींची पालखी 21 जूनला आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये माऊलीच्या रथाची चाचणी घेण्यात आली.
वारी, पालखासाठी असणाऱ्या बैलजोडीला पुणे ते पंढरपूर असा मोठा टप्पा गाठावा लागतो. त्यामुळे बैलांवरही सहाजिकच ताण येतो. हा ताण सहज वाहू शकणारी बैलजोडी यासाठी निवडली जाते. त्यासाठी बैलाचा सरावही आधी घेतला जोता. बैलांच्या खुराकाचीही विशेष काळजी घ्यावी लागते. बैल आजारी पडून नये किंवा थकू नये याचीही काळजी घ्यावी लागते. आता यंदा ही जबाबदारी सोन्या आणि माऊलीवर सोपवण्यात आली आहे.
Discussion about this post