व्हीएसआरएस मराठी न्युज -भाजप-शिवसेना युती असताना शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा होता. सलग तीन वेळा आढळराव पाटलांनी याच मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार राहिलेले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव हे शिरूर लोकसभा मतदारसंघात जोर लावताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केल्याने आढळरावांची गोची झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेने सोबत केलेला बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणंच बदलली. यामध्ये काही दिवस आढळरावांनी संयम ठेवला मात्र, सामनातून हकालपट्टीची बातमी आल्याने त्यांनी शिंदे गटाशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला आणि आपलं राजकीय भवितव्यासाठी शिंदे गटात सामील झाले होते. मात्र, आता भाजकडून शिरूर मतदारसंघावर करण्यात आलेल्या दाव्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यामुळे आढळराव समर्थकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आमदार मिसाळ यांनी केलेल्या घोषणेमुळे आढळराव हे शिंदे गटाचे उमेदवार असणार की भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार अशीही चर्चा रंगत आहे. मात्र, भाजपचे राजकारण बघता त्यांनी धक्कातंत्र वापरलं आणि आढळराव यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास आढळरावांवर ना घर का ना घाट का, अशी परिस्थिती ओढावू शकते. यामुळे आढळराव समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल,असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान मिसाळ यांनी केलेल्या घोषणेमुळे शिवसेनेचे माजी खासदार मात्र सध्या शिंदे गटात गेलेले नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचं टेन्शन वाढलं असणार आहे. मिसाळ यांनी आज (ता.११ सप्टेंबर) केलेल्या या घोषणेमुळे परिसरात कुजबुजही सुरू झाली असून राजकीय चर्चाही रंगत आहेत.
Discussion about this post