व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहीत 22, 23 आणि 24 जूनला सरकारने मंजूर केलेल्या फाईल्स आणि प्रस्तावांचा तपशील मागवला आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आघाडी सरकारने अवघ्या 48 तासांत कोट्यवधी रुपयांचे 106 जीआर मंजूर करत निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी राज्यपालांना पत्रही लिहीत हस्तक्षेपाची मागणी केली होती.
राज्यसरकारने एवढे जीआर कसे मंजूर केले आले, त्याविषयी राज्यपालांनी सविस्तर अहवाल मागवला आहे. सोमवारी (27) पत्र मिळाल्यानंतर आता राज्याच्या मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव (संस्था आणि व्यवस्थापन) यांना या दोन दिवसातल्या मंजून जीआरचा डेटा गोळात्र करण्यास सांगितलं आहे.
Discussion about this post