व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी-छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले.
शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले,छत्रपती शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी’ पदवी बहाल केली. दूरदृष्टीअसलेला,
लोककल्याणकारी यतेचा राजा,
सामाजिक परिवर्तनासाठी ज्यांनी आपलं सारं आयुष्य वेचले ते राजर्षी शाहू महाराज यांच्या
१०० व्या पुण्यतिथी निमित्त आळंदीत आज १०० सेकंद स्तब्धता पाळून विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजप संघटन,ध्यास फाउंडेशन, आळंदी जनहीत फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ते, नेचर फाउंडेशन, एल्गार सेना, शिव संघटना व विविध पक्ष संघटने तर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
Discussion about this post