व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.८ सतत चार पाच दिवस काही ठिकाणी पाऊस कमी जास्त प्रमाणात चालू आहे. धरण क्षेत्रा जवळपास मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.काल पासून आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
गेली काही दिवस सिद्धबेटा लगत असणाऱ्या बंधाऱ्याच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी विळखा होता.धरण क्षेत्रात जवळ, गेली काही दिवस मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने ,एका रात्रीत ज्ञानेश्वरी मंदिर लगत असणाऱ्या नवीन पुल ते नृसिंव्ह सरस्वती मठ जवळ असणाऱ्या बंधाऱ्याच्या नदीपात्रात सिद्धबेट येथील नदीपात्रातील बंधाऱ्या लगत असणारा जलपर्णी विळखा मोठ्या प्रमाणात वाहून आल्याचे सकाळी दिसून आले. त्यामुळे तेथील नदीपात्रात जलपर्णी चे मोठे ढीग दिसून येत आहे.गेली काही दिवस सतत येथील इंद्रायणी नदीचे पाणी रासायनिक प्रदूषणा मुळे मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून येत होते.सिद्धबेट येथील बंधारा पूर्ण भरलेला असून बंधाऱ्या वरून पाणी जात आहे. गरुड स्तंभ ते भक्त पुंडलिक मंदिरा पर्यंत काही दगडी घाट परिसर पाण्या खाली आहे. इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने काही दगडी घाट परिसर पाण्याखाली गेला आहे. तिथे काही नागरिक पाण्यात वाहने उतरवून वाहने धुत असल्याचे चित्र पहायला भेटत आहे. तर सिद्धबेट जवळील बंधाऱ्या खाली मासेमारी करण्यासाठी काही नागरिक नदीपात्रात उतरल्याचे दिसून येत आहे.इंद्रायणी नदीपात्रात पाणी वाढल्याने ते पाहण्यासाठी काही नागरिक जमत असून नदीपात्रा लगत पाण्याजवळ जाऊन मोबाईल द्वारे सेल्फी,ग्रुप फोटो घेत आहेत.या गोष्टी कडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
आषाढी वारी निमित्त काही भाविक वाहनाने प्रवास करून पहिले पंढरपूर येथे विठ्ठल दर्शना करिता जातात. त्यानंतर आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे
इंद्रायणी घाटावर ही भाविकांची पवित्र इंद्रायणी नदीच्या स्नानासाठी गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.
आळंदी व आळंदी लगत असणाऱ्या गावात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. पावसाने विश्रांती दिल्या नंतर शेतातील पेरणी च्या कामाला वेग येणार आहे.
Discussion about this post