व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-श्री क्षेत्र अंकली येथून श्रीमंत सरदार शितोळे सरकार यांच्या वाड्यातून माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान झाले होते.आज आळंदीत माऊलींच्या अश्वांचे हरीनामाच्या गजरात आगमन झाले.आळंदीतले स्थानिक नागरिक व वारकरी भाविक अश्वांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसले.
अश्व प्रथम नदीपलीकडील सरदार बिडकर वाड्यात आले तिथे विधिवत पूजन केले.त्या नंतर माऊलींच्या जयघोषात सनई च्या सुरात टाळ मृदुंग वीणा च्या वाद्यांमध्ये आळंदी मध्ये आगमन झाले.माऊली मंदिरा मध्ये अश्वांचे पूजन करण्यात आले.यावेळी स्वागता साठी मालक आरफाळकर,संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त श्री योगेश देसाई, संस्थान चे व्यवस्थापक माऊली वीर ,संस्थांनचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु व आळंदीतील ग्रामस्थ ,बिडकर कुटुंबीय उपस्थित होते.
त्यानंतर फुलवाले धर्मशाळेत अश्व मुक्कामी पोहचले.फुलवाले धर्मशाळेत मोठ्या संख्येत माऊलींच्या अश्व दर्शनासाठी गर्दी केली होती.
तसेच उद्या २१ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा असल्याने मंदिरात सिद्धेश्वर मंदिर,मुक्ताई मंदिर,संत ज्ञानेश्वर मंदिर ,वीणा मंडप प्रवेशद्वार अशा विविध ठिकाणी मंदिरात तसेच महाद्वार येथे ही आकर्षक अशी फुल सजावट करण्यात येत आहे. माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती.मंदिरात आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप चालू होता.
Discussion about this post