व्हीएसआरएस मराठी न्युज -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाणमधील शेतात डबक्यात अंघोळीसाठी गेलेली तीन बहीण-भावांचा यांचा बुडून मृत्यू झाला आहे. राकेश, रोहित आणि श्वेता अशी त्यांची नावे आहेत. यातील रोहितने आम्ही अंघोळीसाठी जात आहोत असे घरी सांगितले होते.
राकेश किशोर दास (वय-5), रोहित किशोर दास (वय-8) आणि श्वेता किशोर दास (वय- 4) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. मृतदेह मिळालेल्या खड्ड्याच्या बाजूला मुलांचे कपडे आढळले आहेत.
घरापासून अगदी काही अंतरावरच पाण्याचा खड्डा असून तिन्ही भावंडे डबक्यात कपडे काढून उतरले होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलाचे कपडे पाहिले. त्यांच्या घरातील व्यक्तींना तुमची मुले कुठे आहेत असे विचारल्यानंतर त्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी खड्ड्यात पाहिले असता मुलांचे मृतदेह आढळून आले. शेतात अशा प्रकारे पाण्याने भरलेले खड्डे असल्यास त्याच्याभोवती कुंपण करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Discussion about this post