व्हीएसआरएस मराठी न्युज –तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिवाळी सणाच्या दिवसांत ग्रहणाचा हा योग आला आहे. भारतात सूर्यग्रहणाची ही अनुभूती घेता येणार आहे.
खगोलप्रेमींनी सूर्यग्रहणाची अनुभूती घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघण्याचे टाळावे. त्याऐवजी डोळ्यांना इजा होणार नाही अशा स्वरूपाचा चष्मा, गॉगलचा आधार घेत या खगोलीय अविष्काराची अनुभूती घेता येईल.
जयपुर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, नागपुर, द्वारका, सिलीगुडी, तिरुवनंतपुरम या शहरात ग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल तज्ज्ञांनी दिली आहे.
वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण २५ ऑक्टोबरला लागणार आहे. हे सूर्यग्रहण २ वाजून २८ मिनिटांनी असणार आहे. २४ आणि २५ ऑक्टोबरला दोन्ही दिवस अमावस्येची तिथी राहणार आहे. तर २५ ऑक्टोबर मंगळवारी सूर्य ग्रहण असणार आहे.
Discussion about this post