व्हीएसआरएस मराठी न्युज –पंढरपूरमध्ये प्रवेश करताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोलनाका उभा केला आहे. वारी काळात मोठ्या प्रमाणात पालख्यांच्या वाहनांची वर्दळ होणार असून, या वाहनांना टोल माफ करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी वारकर्यांकडून करण्यात आली आहे.
त्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून आषाढी काळात वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
Discussion about this post