व्हीएसआरएस मराठी न्युज –केंद्रीय निवडणूक आयोगाने काही काळासाठी धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. मला हा निकाल अनपेक्षित होता. १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. मात्र माझा कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल, अशी खात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
ठाकरे पुढे म्हणाले की, आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह नाव दिलंय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे. आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले, पण गद्दारांनी काय दिलंय ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे. आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे, म्हणून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागरूक राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला कुणी हरवणार नाही, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले, तेव्हा पण आपण संवाद केला. सगळं देऊनही गद्दार गेले. आता जरा अती होऊ लागलंय. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथं पर्यंत ठीक होतं आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले. सगळ्यांना धन्यवाद दसरा मेळाव्यात विघ्न आणले. पण आपला झालाच. दोन मेळावे झाले अस म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते, त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात ते का? कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात.
शिवसेनेच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष त्यातून शिवसेनेचा महावृक्ष उभा आहे. काल निवडणूक आयोगाने चिन्ह धनुष्य बाण गोठावलं. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते गोठवलं. या लोकांच्या वृत्तीची चीड. आईच्या काळजात कट्यार घुसवली. त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त आनंद कारण त्यांना जमलं नाही, त्यांनी शिवसेनेची लोक फोडून आनंद घेत आहेत. या देशात हिंदू म्हणायची हिंमत दिली, तीच शिवसेना गोठवली काय, आनंद मिळवलात. तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? माझ्या आजोबांनी नाव दिलंय, बाळासाहेबांनी रुजवलंय. आज अनेकांचे फोन. सकाळी ९-९.३० वाजता नारळ फुटला त्याचे तुषार अंगावर मला ते पाणी इतके भिजवले की अनेक जबाबदारी मी सांभाळलं आज शिवसैनिकांच्या अश्रूने भिजलाय.
Discussion about this post