मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | पूर्व आणि पश्चिम उपनगरात २४ तासांसाठी खंडित करण्यात आलेला पाणी पुरवठा मंगळवारी रात्रीपर्यंत सुरळीत झाला नव्हता. उपनगरातील अनेक भागात मंगळवारचा संपूर्ण दिवस पाण्याशिवाय काढावा लागला. सायंकाळी सहानंतर पाणी पुरवठा सुरू होईल असे सांगण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रविवारनंतर पाणीच आले नाही. पश्चिम उपनगरातील अनेक भागात बुधवारी सकाळी देखील पाणी आले नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे ३० जानेवारी सकाळी १०:०० पासून ते ३१ जानेवारी रोजी सकाळी १०:०० पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात २४ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र दुरुस्तीची कामे लांबल्यामुळे आणखी आठ तास पाणी पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता.
Discussion about this post