व्हीएसआरएस मराठी न्युज -केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे षड्यंत्र आहे.
गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग केला व बलिदान दिले, त्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून चौकशीच्या नावाखाली छळ केला जातोय त्याविरोधात काँग्रेस आवाज उठवत राहील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी केली जात असल्याने केंद्र सरकारच्या या सूडबुद्धीच्या कारवाईविरोधात मुंबईत मंत्रालयामोर सत्याग्रह करण्यात आला. त्यावेळी नाना पटोले बोलत होते.
Discussion about this post