व्हीएसआरएस मराठी न्युज -हुक़ूमशाही मोदी सरकारने राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी न्यायालयाच्या निकालाला 30 दिवसांची स्थगिती असतानाही तातडीने गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज देशात अराजकता आहे. विरोधकांना बाेलू दिले जात नाही. भारतात लाेकशाहीची हत्या हाेत आहे हे राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात बोलले होते हे आज खरे ठरत आहे. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. याचीच पंतप्रधान मोदींना भीती वाटली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाल्या.
Discussion about this post