व्हीएसआरएस मराठी न्युज आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
भामा-आसखेड धरणातील पंपहाऊस येथील तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे आज दि.२४रोजी ही दुपारपर्यंत तरी आळंदी जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पुरवठा सुरू झालेला दिसला नाही.
आळंदीत दिवसाआड दोन विभागात पाण्याचे नियोजन असल्याने आळंदी गावठाणात विभागात सलग चार दिवस तर हवेली विभागात सलग तीन दिवस पाणी नसल्याने आळंदी शहरात पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडालेली दिसत आहेत.
आज व काल मोठया प्रमाणात नागरिकांनी विकत पाण्याचे टॅंकर मागवले गेले व गेली काही वर्षे सतत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाने नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय गेलेल्या मंदिरापाशी व माऊली बागेत या दोन्ही ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढतानाचे चित्र आज रविवारी दिसले.भामा-आसखेड धरणातील पंपहाऊस येथील मोटारींना विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्येच तांत्रिक दोष निर्माण झाल्याने अद्यापही आळंदी शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
तेथील तांत्रिक दोष पूर्णपणे दुरुस्त अजूनही झालेला दिसत नाही.६० तास पेक्षा जास्त वेळ दुरुस्तीचे काम सतत सुरू असूनही तेथील
तांत्रिक दोष मिटलेला दिसत नाही.आळंदी जलशुद्धीकरण केंद्रावर अद्यापही पाणीपुरवठा न झाल्याने ते स्पष्ट होत आहे.
मनसे तालुकाध्यक्ष (रस्ते सुविधा आस्थापना) प्रसाद बोराटे यांनी
सोशल मीडिया मार्फत
आळंदी गावठाणात सलग चार दिवस व हवेली विभागात सलग तीन दिवस पाणी नसल्याने आळंदीतील नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडालेली आहे परिस्थिती चे गांभीर्य पाहून आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था (टँकरद्वारे पाणी पुरवठा) करून नागरिकांना पाणीपुरवठा करावा.अशी आळंदीकर नागरिकांच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे.आळंदीकर नागरिकांची बहुतांशी सद्यस्थिती पाहून तशीच मागणी आहे.
नुकताच फेब्रुवारी महिन्यापासून आळंदीत भामा- आसखेड पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा होत आहे.परंतु पाईपलाईन लिकेज,पाईपलाईन लाईन फुटणे, विद्युत पुरवठा जास्त वेळ खंडीत झाल्याने पाणीपुरवठयास उशीर ,सद्यस्थितीत भामआसखेड येथील पंपहाऊसमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पाणीपुरवठा बंद
अश्या विविध अडचणी शहराला पाणीपुरवठा करताना निर्माण होताना दिसत आहे.
Discussion about this post