व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात इंद्रायणी काठी १५६ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
कोरोनाच्या काळात जलाराम सत्संग मंडळ आळंदी यांचे अन्नदान इंद्रायणी घाट,पालिका शाळा व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय व विविध ठिकाणी लॉकडाऊन च्या १५६ दिवसाच्या काळात गरजवंताला अन्नदान पोहचवण्याचे सहकार्य श्री अजित वडगांवकर व त्यांचे कुटुंबीय ,सहकारी यांनी केले.
याबद्दलची त्यावेळेस ची परिस्थितीची व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती यांचे लेखन या पुस्तकात केले आहे.
यावेळी कॉसमॉस बँक अध्यक्ष पुणे मिलिंद काळे, मा. उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य- जि. प.पुणे श्री पांडुरंग पवार यावेळेस म्हणाले वडगांवकर कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाच्या काळात कठीण परिस्थितीत १५६ दिवस समाजसेवेचे कार्य केले.त्यांना माऊली नी च प्रेरणा देऊन हे कार्य त्यांच्या हातातून घडवले.त्या कोरोनाच्यापरिस्थितीत लोकांची काळजी घेतली.विश्वस्त प्रकाश काळे व शिक्षक ,शिक्षिका यांनी ही त्यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अजित वडगांवकर म्हणाले आपल्या कडे असणारे ज्ञान, भांडवल, श्रम हे जीवन समाज उपयोगी पडले पाहिजे.मनात अहंकार न ठेवता कार्य केले पाहिजे.
कोरोनाच्या १५६ दिवसाच्या काळात आळंदी ग्रामस्थ ,गावातील पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या सहकारी,अन्नदान करणाऱ्या विविध संस्थेंचे त्यांनी आभार मानले. जलाराम सत्संग मार्फत केलेल्या करोना काळातील १५६ दिवसांच्या अन्नदान सेवा गरजवंताला पोहचवणे या कार्याची व्हिडिओ चित्रफीत द्वारे माहिती दिली.
प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प.पंकज गावडे यांनी अध्यात्म व समाजसेवा या विषयावर व्याख्यान केले. या व्याख्यानात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज संत मुक्ताई ,संत नामदेव ई. संतांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना जीवन चरित्र यांचे वर्णन केले.
ताटी उघडा ज्ञानेश्वरा याचे प्रसंग वर्णन,संत मुक्ताई ने चांगदेवास दिलेले ज्ञान,संत नामदेव यांना ज्ञानाची करून दिलेली जाणीव,
संत नामदेव यांनी विविध ठिकाणी फिरून वारकरी संप्रदाय प्रसार व ते वाढवण्याचे कार्य,ज्ञानेश्वरी व अमृतनाभव यांचा अर्थ महत्व ,महात्मा गांधीजी वर असलेला संत तुकाराम महाराज यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव याबद्दल माहिती सांगितली.
भूतकाळातील व या वर्तमान काळा पर्यंत माणसाच्या भूमिका टप्पे कसे बदलत गेले त्याचे वर्णन करताना म्हणाले पहिल्या टप्प्यात
दुसऱ्या चे दुःख पाहून माणसे बाहेर निघत होती व मदत करत होती.दुसऱ्या टप्प्यात
स्वतःच्या सुखात माणूस सुखी राहू लागला.आताचा तिसरा टप्पा म्हणजे दुसऱ्याचे सुखी जीवन पाहून माणूस स्वतः दुःखी होत आहे. सध्याच्या परिस्थितीवर
समाज प्रबोधन करताना म्हणाले
शाळेत जाणाऱ्या मुलांना पालकांनी तिथे गेल्यावर आपापसात सहकार्य करण्याची शिकवण घरातून दिली पाहिजे.घरा घरात
पुरुष व महिलांनी पुस्तक वाचन केले पाहिजे.टीव्ही वर समाज बिघडवणाऱ्या नको त्या मालिका पाहणे बंद केले पाहिजे.जीवन जगत असताना ,कार्य करत असताना, आपल्या जीवनातील अहंकार, मीपणा गळून पडला पाहिजे.आधात्म याचे व्यवसायिकरण न होता अध्यात्म जीवन जगण्याची कला बनली पाहिजे.आपले जीवन सार्थकी लागण्यासाठी आपल्या हातातून चांगले कार्य घडले पाहिजे.या राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणाऱ्या मुलांची गरज आहे. चांगल्या राष्ट्र निर्मितीसाठी मी २०० विद्यार्थी घडवणार आहे.हे जीवन जगताना ते कश्या करता जगत आहोत? हा अंतःकरणाला प्रश्न पडून कश्या करता जगले पाहिजे?माझा आनंद ,माझे सुख कशात आहे? ह्याचा शोध घेतला पाहिजे.
यावेळी अॅड. विलास काटे,दिनेश कुऱ्हाडे , आनंद वडगांवकर,
भानुदास प-हाड, प्रसाद बोराटे, विविध मान्यवर व काही आळंदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
Discussion about this post