व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
पिंपरी-चिंचवड महापालिका व तसेच इंद्रायणी नदीच्या काठी असणाऱ्या गावातून मोठ्या प्रमाणात रासायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने आज बुधवार रोजी इंद्रायणी नदी पूर्ण फेसाळलेली दिसत होती.नदीपात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस दिसून काहीसे नदीपात्र बर्फाळ झाल्याचे दिसून येत होते.गेल्या काही वर्षांपासून असेच चित्र इंद्रायणी नदीचे अधून मधून सारखे दिसत आहे.
या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव ही धोक्यात येत आहेत. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपा द्वारे शेतीला ही नेले जाते..विविध पिकांना दिले जाते.त्या पिकांवर दुरोगामी परिणाम होत आहे.
ती पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत आहेत.भविष्यात नदीपात्रातील पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये ही परिणाम दिसून येईल.तसेच आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने अनेक भाविक रोज माऊलींच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. इंद्रायणी नदी ही पवित्र म्हणून ओळखली जात असल्याने त्यात भाविक स्नान ही करतात.त्यामुळे त्वचारोग ही संभवतात.दोन्ही बंधाऱ्या जवळ मोठया प्रमाणावर जलपर्णीचा विळखा दिसून येत आहे.
आळंदीतील नागरिक व भाविक ही प्रदुषित झालेली नदी व नदीपात्रातील सांडपाण्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास येत असल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषित झालेल्या नदीकडे लक्ष कधी देणार?रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर प्रसाशन कारवाई कधी करेल?याकडे सध्या नागरिकांचे लक्ष आहे.
Discussion about this post