बेंगळुरू । व्हीएसआरएस न्यूज ।
भारतीच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आयसीसी वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवून दिले. भारतीय क्रिकेट भविष्यात देखील दमदार कामगिरी करणार याचे हे संकेत होते. आता या संघातील अनेक खेळाडूंना आयपीएल २०२२ साठी होणाऱ्या मेगा लिलावाची उत्सुकता आहे. पण आयसीसी स्पर्धेत शानदार कामगिरी करून देखील या संघातील ८ खेळाडूंना आयपीएल लिलावात भाग घेता येणार नाही.
भारताच्या १९ वर्षाखालील संघात असे ८ खेळाडू आहेत ज्यांना नियमामुळे आयपीएलच्या लिलावात भाग घेते येणार नाही. एका रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या नियमानुसार १९ वर्षाखालील जो खेळाडू कमीत कमी एक फर्स्ट क्लास मॅच खेळला आहे किंवा लिस्ट ए ची मॅच खेळला आहे अशा खेळाडूला लिलावात सहभागी होता येईल. करोनामुळे बीसीसीआयने केल्या काही महिन्यात फर्स्ट क्लास सामन्यांचे आयोजन केले नाही. या नियमानुसार जर खेळाडूकडे देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नसेल तर किमान लिलावाच्या आधी त्याचे वय १९ वर्ष हवे. आता या नियमामुळे भारतीय संघातील दिनेश बावा,शेख रशीद, रवी कुमार, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अंगकृष रघुवंशी, मानव पारेख आणि गर्व सांगवान यांना वाट पाहावी लागणार आहे.
अनेक राज्य बोर्डांचे असे मत आहे की, गेल्या काही काळात देशांतर्गत सामने झाले नाहीत.त्यामुळे खेळाडूंना या नियमातून सवलत दिली पाहिजे. आता काही खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याची परवानगी दिली आहे. पण ही स्पर्धा १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि लिलाव त्याच्या आधी होईल. आयपीएलच्या लिलावात ५९० खेळाडू आहेत.
Discussion about this post