व्हीएसआरएस मराठी न्युज –
वाहतूक कोंडीसाठी पोलीस किंवा महापालिका नेमका कोणता उपाय शोधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या चर्चांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शहरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्येची जबाबदारी नवीन पोलिस उपायुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
पुण्यात नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस उपायुक्त आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. शहरात अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्या प्रत्येक परिसरातील पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबत पाहणी करताना वाहतूक कोंडीची कारणंं शोधून काढावी लागणार आहे. या सगळ्याचा एक अहवाल तयार करावा लागणार आहे आणि तो अहवाल आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे.
संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख आणि विजय मगर यांचा नवीन उपायुक्तांमध्ये समावेश आहे. पोलिसांच्या बदल्या झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहू नये किंवा वाहतूक कोंडीसाठी ज्या उपाययोजना आखल्या आहेत. त्याचं योग्य पालन करण्याच्या सूचना उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत. नवीन अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच या समस्येवर लक्ष्य केंद्रित करावे, अशी सूचना गुप्ता यांनी केली आहे.
शहरातील वाहतूक कोंडीचा विषय दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना पोलिसांकडून किंवा महापालिकेच्या मदतीने केल्या जात आहे. वाहतूक कोंडीचा अहवाल सादर केल्यानंतर वाहतूक कोंडीची नेमकी कारणं समोर येतील.
Discussion about this post