व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-दि.14 माजी राज्यपाल व सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार मा.श्रीनिवासजी पाटील साहेब यांच्या हस्ते चंद्रशेखर वाघ लिखित ‘मनस्वास्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले.यावेळी श्री.पाटीलसाहेब म्हणाले , “मनशांती ही आजच्या काळाची गरज आहे आणि अध्यात्मातून हे साध्य होणार आहे.अशा प्रकारचे पुस्तक यासाठी निश्चितच मदत करेल.”
यावेळी सारंग पाटील , डॉ.चंद्रकला वाघ , मानसिंह चव्हाण , दादासाहेब नांगरे , सदाशिव खटावकर यांची उपस्थिती होती.
आजच्या धावपळीच्या जगात मनाचे स्वास्थ्य हरवत चालले आहे.त्यामुळे जीवन हे आनंद देण्यापेक्षा दुःख देणारेच आहे की काय अशी धारणा प्रबळ होत चालली आहे.त्यामुळे अनेक जण मनाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहे.
मनस्वास्थ्य ची वाट सुकर करण्याचे काम हे पुस्तक करणार आहे.अनेक अध्यात्मिक विचार व त्याला दिलेली आधुनिकतेची जोड हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.अध्यात्म – योग हे जीवन जगण्याची कला आहे. हा विचार या पुस्तकातून प्रकर्षाने मांडला आहे. अतिशय मोजक्या शब्दात व ओघवत्या हिंदी भाषेत मांडणी यामुळे हे पुस्तक वाचणीय झाले आहे.
Discussion about this post