व्हीएसआरएस न्युज इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १३ षटकात बिनबाद २१ धावा केल्या आहेत. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी ९ धावांवर नाबाद आहेत.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इंग्लंडचा पहिला डाव ६५.४ षटकांत केवळ १८३ धावांवर संपला.
इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली.
तसेच सॅम करनने नाबाद २७ आणि जॉनी बेअरस्टोने २९ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर शमीने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
इंग्लंड – रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिब्ली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डॅनियल लॉरेन्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
Discussion about this post