व्हीएसआरएस न्युज INDvsENG 2nd Test : लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी मात केली आहे. मोहम्मद शमी, केएल राहुलची यांची खेळी निर्णायक ठरली.
ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात टीम इंडियाने विराट पराक्रम केला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात केली.
मालिकेत पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं.
परंतु भारताने दिलेलं टार्गेट इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
Discussion about this post