व्हीएसआरएस न्युज तब्बल 41 वर्षांनंतर भारताची हॉकीमधली पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. भारतीय पुरुष संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत कांस्य पदक मिळवलं आहे.
जर्मनीने आक्रमक सुरुवात करत भारताविरुद्ध पहिला गोल करून आघाडी घेतली, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं गोल करून बरोबरी साधली.
त्यानंतर जर्मनीने सलग दोन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. मात्र भारतानेही दोन गोल केले.
भारताकडून सिमरनजीत सिंहने पहिला गोल केला.
त्यानंतर हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी दोन गोल केले. सिमरनजीत सिंहने भारताकडून दोन गोल केले आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी पाहता भारत आणि जर्मनी दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे ग्रुप सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी काहीशी सरस राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.
दोन्ही संघ आपआपल्या गटांमध्ये दुसऱ्या स्थानावर होते. मात्र भारताला केवळ एका पराभवाचा सामना करावा लागला होता. तर जर्मनीचा मात्र दोन सामन्यांत पराभव झाला होता.
विश्व विजेत्या बेल्जियमच्या विरोधात जर्मनीचा पराभव झालाच. पण क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 3-4 नं झालेला पराभव पाहता, या संघावर दबाव टाकणं शक्य असल्याचं लक्षात येतं.
Discussion about this post